काही भोळ्या लोकांच्या बाबतीत , जे त्यांच्या मनात असतं तेच ओठांवर असतं. असं असणं खरंतर खूप चांगलं आहे. माणसाने तसंच रहावं जसा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे.पण हे जग खूप वेगळं आहे.इथे सगळेजण प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्यांना हवा तसा घेतात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे , त्याला काय म्हणायचं आहे याचा विचार न करता.
ही भोळी माणसं एखादी गोष्ट खूप लवकर मनाला लागून घेतात.लोकांच्या थोड्याशा तिरकस , उपरोधात्मकपणे बोलण्याने त्यांच्या मनावर परिणाम होतो. पण खरंतर हे जग कधीच बदलणार नाही आणि या भोळ्या लोकांना जर जगायचं असेल तर त्यांना मलूल राहून चालणार नाही. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना गूढता ठेवावी लागेल.आपल्या मनाचा थांग लोकांना लावू दिला तर लोक त्याचा फायदा घेतात.
कधी कधी स्वत:ची तत्त्व मागे ठेवावी लागतात. वेळेनुसार माणसाला बदलावंच लागतं. नाहीतर या शहाण्यांच्या दुनियेत आपणंच मुर्खात निघतो.या जगात जागरूकपणे वागावं , आपला नैसर्गिक स्वभाव जपत पण स्वत:साठी स्वार्थी बनून......
भारी💯💯💯💯💯❤
ReplyDeleteThank You :)
Delete