एक वेळ अशी येते माणसाकडे
जेव्हा तो जिंकलेलं सगळं हरलेला असतो
जे गमावण्याची त्याला सगळ्यात जास्त भीती असते
आता तर गमवायला ती भीतीही नसते...
कागद कोरा होऊन जातो
पुन्हा एकदा मोकळं आभाळ रंगवायला
अन् त्या मोकळ्या आभाळात
गरूड झेपेचं स्वप्न पहायला....
पण एका चुकीची शिक्षा म्हणून
एक संधी मिळते का त्याला
पुन्हा एकदा हवं तसं
स्वत:च्या मालकीचं आभाळ
विकत घ्यायला.....????
-कोमल
No comments:
Post a Comment