खूप दिवसांनी कधीतरी
तुझा अचानक मेसेज येतो...
तुझ्या नावाचं ते notification पाहून
हसणं विसरलेल्या या चेहर्यावर
नकळत हसू उमटतं...
मरून पडलेल्या फुलावर
कोणीतरी मुळाशी पाणी घालावं
आणि तरारून आलेल्या त्या रोपानं
स्वत:च्याच मनाशी बहरणं ठरवावं
तसंच काहीसं होतं....
त्यात लिहीलेलं असतं,...
"ठरवलं होतं तुला न भेटण्याचं
काहीही न सांगता दूर जाण्याचं
तुझ्या मनातलं सगळं माहीत असूनही
जाणून तुला दुखावण्याचं...
पण आज भेटावंसं वाटतंय
खूप दिवस झाले आपण भेटलेलो नाही..
सोबत असताना तुझ्या चेहर्यावरचे
ते अवखळ अन् लटके भाव आठवताय मला अजून पण
खोटं खोटं तुझं रागावणं
अन् मी मनवण्यासाठी वाट पहाणं
तुझं कोपर्यात जाऊन रूसून बसनं
तुझा रागंही किती लवकर जायचा ना !!!
प्रेमाने एक घास भरवल्यावर
तुझं माझ्या मिठीत येणं
अगदी एखाद्या लहान मुलीसारखं
आठवतंय मला अजून पण....!!
माझं नेहमीच be practical बोलणं आणि वागणं
तुला कधी आवडलं नाही माहीत आहे मला
नेहमीच प्रेमाच्या शोधात असणारी तू
मी कधीच तुला प्रेम दिलं नाही ना गं ???
मी नेहमीच प्रयत्न केला
तुला बदलण्याचा
पण बरं झालं ,नाही बदललीस तू
तू अशीच रहा बालीश,अवखळ ,कसलाही विचार न करणारी स्वच्छंद
कारण जे तुझ्यात आहे त्याच्या लायक मी नाही !!!
म्हणूनच तर न सांगता गेलो निघून तुझ्या आयुष्यातून खूप दूर
तुझ्या हाका ऐकू येत होत्या
पण जाणून मागे नाही फिरलो...
पण आज वाटतंय,
तुझ्याशी बोलावं
माफी मागावी तुला दुखावल्याची
बोल....भेटशील ना एकदा ???
मी वाट पहातोय
हो... त्याच जागेवर
जिथे कधीतरी तू माझी खूप वाट पाहीलीस
पण मी मागे वळून पाहीलं नाही
आज मी पहातोय वाट
तुझी...फक्त तुझी.....
-To be continued
No comments:
Post a Comment