माणसाच्या आयुष्यात सुर्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे ना???
एखाद्या दिवशी कितीही वाईट घडलं ,
अगदी होत्याच नव्हतं झालं
तरी एका रात्रीत ताकद असते
त्या दु:खाची तीव्रता कमी करण्याची
आणि दुसर्या दिवशी उगवणार्या सुर्याच्या किरणात ताकद असते
पुन्हा नव्याने उमेद जागवण्याची
मान गळून पडलेल्या रोपालाही
ताठ मानेने उभे करण्याची....
-कोमल
No comments:
Post a Comment