कोणत्याही गोष्टीची वाट पहाणं
हा वेळेचा अपव्यय आहे
एकतर तिला कायमचं विसरून जायचं
किंवा तिला मिळवण्यासाठी
आकाश पाताळ एक करायचं...
एखाद्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात असणं
हा केवळ नियतीचा योगायोग म्हणता येणार नाही
किंवा त्या गोष्टीचं नशीबही नाही
आपलीच इच्छाशक्ती कुठेतरी तिला खेचत असते आयुष्यात येण्यासाठी
म्हणतात ना विलगीकरण निसर्गाचा नियम आहे
ऊर्जेचा प्रवाह हा नेहमी ऊर्जेच्या दिशेने असतो
आणि काळोखात नेहमी काळोखच ओळखला जातो...
-कोमल
No comments:
Post a Comment