संघर्ष स्वप्नांचा
जेव्हा स्वप्नांचा संघर्ष
वास्तवाशी सुरू होतो
तेव्हा विस्कळीत होतं सगळं काही
स्वप्नांना माघार घेेणं माहीत नसतं
आणि वास्तवाला बदलणं शक्य नसतं...
पण जिंकणार कोणीतरी एकच असतं
स्वप्न जिंकली की माणूस जिंकतो
अन् वास्तव जिंकलं की समाज जिंकतो....
पण वास्तवाशी जुळवून घेऊन
जेव्हा स्वप्नांसाठी झटतो
तेव्हा माणूस समाजही जिंकतो....
-कोमल केरडे
No comments:
Post a Comment