गोष्ट लग्नानंतरची
सगळंच बदलतं
जेव्हा एक नाव बदलतं
आपल्या नावाचं सर्वस्व
जेव्हा त्याचं नाव घेतं....
काही गोष्टी त्याच्या होतात
तर काही मला दुरावतात
तो आणि त्याचं जग
जेव्हा माझ्या जगाचा भाग होतात...
घर सुटतं कायमचं
राहतात फक्त आठवणी अन् चिंता
चिंतेच्या त्या चितेत मग
मन होळीसारखं दहन होतं...
जुन्या नात्यांचं अस्तित्त्व संपतं
नवीन नात्यांसाठी
हसणं विसरून हसणं शिकायचं
त्याच्या घरासाठी....
स्वतंत्र आहे मी
असं कायमंच सांगायचं
पण नकळतपणे स्वातंत्र्य
त्याच्या स्वाधीन करायचं....
कोमल कोरडे
No comments:
Post a Comment