कधी कधी
आपल्याच मनातल्या वादळामुळे
जवळची माणसेही दुरावत जातात
अगदी पाचोळ्यासारखी अलगद उडून जातात
ना ती समजून घेत कधी
वादळाचं कारण
हात घट्ट धरायचा सोडून
विरूद्ध दिशेला तोंड फिरवतात
अशा वेळी खर गरज असते
त्यांच्या सोबत असण्याची
पण फारच आक्रताळी वागणं आहे तुझं
असं बोलून मलाच दुषणं देतात
वेळेनुसार भरलाय खरं कचरा मनात
प्रेम नावाचा आल्हाद आता उरलाच नाही
कसं समजाऊ त्यांना
फक्त तुम्हीच आहात आयुष्यभर पुरणारे
नाहीतर तुटलेले तारे आता ना जमीनीवर आहेत ना आकाशात....
-कोमल
Anxiety. org
No comments:
Post a Comment