हातून होणार्या चुकांबद्दल
आधीच कळलं असतं तर किती बरं झालं असतं???
आयुष्याचं चुरगळलेला कागद होण्याआधीच
त्याची नीट घडी घालून
त्याला उंच आकाशात उडवलं असतं.....!!!!!
किंवा एखादी सुंदर कविता लिहून
त्याला कायमचं अजरामर केलं असतं...
मग सगळ्यांच्याच ते कायम लक्षात राहिलं असतं..
आणि इतरांना चुकू न देता ते त्यांची वाट बनलं असतं....
-कोमल
No comments:
Post a Comment