काही अशी लोक आयुष्यात येतात...जी आपल्यावर खूप प्रभाव टाकतात..आपल्याला वाटायला लागतं ती गुरू बनून आपल्या आयुष्यात आली आहेत.ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.खरंतर ती गुरूच असतात पण गुरू द्रोणाचार्यांसारखी. ज्यांना नेहमीच शिष्यापेक्षा प्रिय असतं स्वत:चं शिष्याचा गुरू असणं .ज्यांना नेहमी वाटत असतं, शिष्यावर अभिमान करता येवो अथवा न येवो पण शिष्याने आणि सर्वांनीच कायमच त्यांचा अभिमान करावा...असे गुरू मग अर्जुन श्रेष्ठ बनावा म्हणून एकलव्याकडून अंगठा मागायलाही मागे पुढे पहात नाही..यातून मग असा शिष्य जन्माला येतो जो सर्वश्रेष्ठ असतो पण एकट्याशीच लावलेल्या शर्यतीत...त्यामुळे शिष्य एकवेळ श्रेष्ठ नसला तरी चालतो पण गुरू स्पर्धा करणारा नसावा...
-कोमल