Total Pageviews

Tuesday, June 30, 2020

झेप


वादळ


तुझी आठवण...


स्वभाव 2

शिक्षणामुळे माणसात फक्त तर्क वितर्क करण्याची क्षमता येते. पण योग्य निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे शिक्षणासोबत एका निर्मळ , स्वच्छ मनाची गरज असते जे नेहमी आपल्या माणसांच्या हिताचा विचार करेल. माणूस शिकलेला आहे म्हणून तो नेहमी बरोबर निर्णय घेईल असे होत नाही. पण एक गोष्ट तो नक्की करू शकतो फक्त शिक्षणाच्या जोरावर ते म्हणजे गोष्टी अस्ताव्यस्त करणं , आणि आयुष्यभर त्यावर तर्क करणं...ते म्हणतात ना "माकडाच्या हातात दिला कारभार , त्यानं घान करून भरवला दरबार".....
                                             -कोमल

प्रेम हे


फक्त तू नाहीस


प्रेम हे


अंकुर अस्तित्त्वाचा


सोबत शब्दांची...


तुझं येणं...


पुन्हा पावसालाच मागणं...


Monday, June 29, 2020

स्वभाव 1

काही भोळ्या लोकांच्या बाबतीत , जे त्यांच्या मनात असतं तेच ओठांवर असतं. असं असणं खरंतर खूप चांगलं आहे. माणसाने तसंच रहावं जसा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे.पण हे जग खूप वेगळं आहे.इथे सगळेजण प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्यांना हवा तसा घेतात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे , त्याला काय म्हणायचं आहे याचा विचार न करता.
ही भोळी माणसं एखादी गोष्ट खूप लवकर मनाला लागून घेतात.लोकांच्या थोड्याशा तिरकस , उपरोधात्मकपणे बोलण्याने त्यांच्या मनावर परिणाम होतो. पण खरंतर हे जग कधीच बदलणार नाही आणि या भोळ्या लोकांना जर जगायचं असेल तर त्यांना मलूल राहून चालणार नाही. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना गूढता ठेवावी लागेल.आपल्या मनाचा थांग लोकांना लावू दिला तर लोक त्याचा फायदा घेतात.
       कधी कधी स्वत:ची तत्त्व मागे ठेवावी लागतात. वेळेनुसार माणसाला बदलावंच लागतं. नाहीतर या शहाण्यांच्या दुनियेत आपणंच मुर्खात निघतो.या जगात जागरूकपणे वागावं , आपला नैसर्गिक स्वभाव जपत पण स्वत:साठी स्वार्थी बनून......

                      -कोमल

प्रेम हे


आतला आवाज #भाग 9


या जीवनात येऊन काहीतरी करायचंय


प्रेम हे


प्रेम हे


आतला आवाज #भाग 8


भरती ओहोटी


प्रेम हे


प्रेम हे


आतला आवाज


कधी जमलंच तर


आठवणींचे ठसे


प्रेमाचा झरा


कवाडं

घराला कवाडं असतात
हवा खेळती रहाण्यासाठी
पण मनाची कवाडं मात्र नेहमी 
वादळं घेऊन येतात
आठवणींच्या वेशात
आणि धुरकट करतात नजर
अशा कवाडांना खरं कधी खोलूच नाही
ती बंद असलेलीच बरी
साचलेला आठवणींचा कचरा आतच रहावा
अन् निर्णय घ्यावा विवेकाने कायम
मनाला नाकारून....

                          -कोमल

खूप दिवसांनी कधीतरी #भाग 2

आज तू वाट पहातोयेस
 मला खरंच पटत नाही
वेळेनुसार तू बदलला आहेस
की वेळच बदलली...???
वाट पहाणं कधीच सोपं नसतं रे
विखुरलेल्या तुकड्यांना जोडून 
पुन्हा नव्याने हसणं
खरंच खूप अवघड असतं....
आठवतंय तुला
माझं सतत वाट पहाणं
वाट पहाता पहाता
दिवसामागून रात्र होणं
रात्रीच्या गर्द काळोखातही
तुझीच सावली दिसणं
स्पर्ष करायला गेलं की
नकळत विरून जाणं....
तुझे शब्द आठवले
आणि हरवून गेले गतकाळात
पण प्रेम नावाचं खेळणं 
मी कधीच तोडलंय मनात...
माझ्या सुखाचं ओझं
आता मीच पेलीन म्हणतेय
खरं खोटं समजून आता
मीच पाठ फिरवतेय...
आर्त प्रेमाची हाक 
आता ऐकू जरी येईल
तरी पोळलेल्या या मनाला स्पर्षून
सर पावसाचीही वाफ होईल....
                        -कोमल

खूप दिवसांनी कधीतरी- भाग 1

खूप दिवसांनी कधीतरी
तुझा अचानक मेसेज येतो...
तुझ्या नावाचं ते notification पाहून
हसणं विसरलेल्या या चेहर्यावर
 नकळत हसू उमटतं...
मरून पडलेल्या फुलावर
कोणीतरी मुळाशी पाणी घालावं
आणि तरारून आलेल्या त्या रोपानं
स्वत:च्याच मनाशी बहरणं ठरवावं
तसंच काहीसं होतं....

त्यात लिहीलेलं असतं,...

"ठरवलं होतं तुला न भेटण्याचं
काहीही न सांगता दूर जाण्याचं
तुझ्या मनातलं सगळं माहीत असूनही
जाणून तुला दुखावण्याचं...
पण आज भेटावंसं वाटतंय
खूप दिवस झाले आपण भेटलेलो नाही..
सोबत असताना तुझ्या चेहर्यावरचे 
ते अवखळ अन् लटके भाव आठवताय मला अजून पण
खोटं खोटं तुझं रागावणं 
अन् मी मनवण्यासाठी वाट पहाणं 
तुझं कोपर्यात जाऊन रूसून बसनं
तुझा रागंही किती लवकर जायचा ना !!!
प्रेमाने एक घास भरवल्यावर
तुझं माझ्या मिठीत येणं
अगदी एखाद्या लहान मुलीसारखं
आठवतंय मला अजून पण....!!
माझं नेहमीच be practical बोलणं आणि वागणं 
तुला कधी आवडलं नाही माहीत आहे मला
नेहमीच प्रेमाच्या शोधात असणारी तू
मी कधीच तुला प्रेम दिलं नाही ना गं ???
मी नेहमीच प्रयत्न केला 
तुला बदलण्याचा
पण बरं झालं ,नाही  बदललीस तू
तू अशीच रहा बालीश,अवखळ ,कसलाही विचार न करणारी स्वच्छंद
कारण जे तुझ्यात आहे त्याच्या लायक मी नाही !!!
म्हणूनच तर न सांगता गेलो निघून तुझ्या आयुष्यातून खूप दूर
तुझ्या हाका ऐकू येत होत्या 
पण जाणून मागे नाही फिरलो...

पण आज वाटतंय,
तुझ्याशी बोलावं
माफी मागावी तुला दुखावल्याची
बोल....भेटशील ना एकदा ???
मी वाट पहातोय
हो... त्याच जागेवर
जिथे कधीतरी तू माझी खूप वाट पाहीलीस
पण मी मागे वळून पाहीलं नाही
आज मी पहातोय वाट
तुझी...फक्त तुझी.....
                                     -To be continued 


समांतर किनारा

तुझं दूर असणंही चालेल मला
पण तुझं नजरेआड होणं नाही
तुझा अबोलाही सहन करेन मी
पण तुझं निरोप घेणं नाही....
तू तिथेच रहा
नदीच्या पल्याड समांतर किनार्यावर
दोघंही करू प्रवास
एकाच प्रवाहासोबत पण हातात हात न घेता....
नाही करणार प्रयत्न मी
कधीच तुझ्यापर्यंत पाहोचणारा
स्वप्नातही नसेल कधी
पूल किनार्यांना जोडणारा....
कधी चुकून हवा असेल
तुला ओळखीचा निवारा
फक्त एकदा समोर पहा
एक नाव नेहमीच असेल 
जर कधी वाटलाच सोडावासा किनारा ....

                             -कोमल
123RF.com

आपली माणसं

कधी कधी
आपल्याच मनातल्या वादळामुळे
जवळची माणसेही दुरावत जातात
अगदी पाचोळ्यासारखी अलगद उडून जातात
ना ती समजून घेत कधी
वादळाचं कारण
हात घट्ट धरायचा सोडून
विरूद्ध दिशेला तोंड फिरवतात
अशा वेळी खर गरज असते
त्यांच्या सोबत असण्याची
पण फारच आक्रताळी वागणं आहे तुझं
असं बोलून मलाच दुषणं देतात
वेळेनुसार भरलाय खरं कचरा मनात
प्रेम नावाचा आल्हाद आता उरलाच नाही
कसं समजाऊ त्यांना 
फक्त तुम्हीच आहात आयुष्यभर पुरणारे
नाहीतर तुटलेले तारे आता ना जमीनीवर आहेत ना आकाशात....

                       -कोमल
Anxiety. org

आतला आवाज #भाग 7

पाण्याच्या बुडबुड्यासारखी अवस्था होते कधी कधी
हवेला कोंडून घेतलेलं 
एका पातळ आवरणात
आणि त्या आवरणाला जपण्याची वेडी धडपड
कारण ते आवरणच असतं आपलं सुखद क्षेत्र
कोणीतरी हळूच त्याला बाहेरून छेडू लागलं
की मग स्वत:च कोंडलेलं अस्तित्त्व जपण्याचा केविलवाणा प्रयत्न
अगदीच नकोसं झालं की अस्तित्त्व संपवून दुसर्यांच्या विश्वात विलीन होणं आलं 
आणि बुडबुड्याबाहेरच्या जगाचंही विस्कटणंही.....

                                             -कोमल
Revelsystems. com

गुंता

खरं प्रयत्न करतेय मी
स्वत:ला शोधण्याचा
पण गुंता इतका वाढलाय
की सुरूवातीचा धागाच सापडत नाही आहे
ज्यात मी अडकली आहे 
तो भाग तर तुझाच आहे
पण तु केव्हाच त्याला वेगळं केलंय स्वत:पासून
आता जो भाग आहे 
तो केवळ एक निर्जीव तुकडा आहे
ज्यात ना प्रेम आहे 
ना तुझी जाणीव
एकच गोष्ट करू शकते मी आता
तुझ्या त्या निर्जीव अस्तित्त्वात अडकलेला 
माझा भागही तोडून फेकून देते
आणि सुरू करते एक आयुष्य नव्याने
एका नवीन जखमेसोबत
                       -कोमल


आतला आवाज # भाग 6

कोणत्याही गोष्टीची वाट पहाणं
हा वेळेचा अपव्यय आहे
एकतर तिला कायमचं विसरून जायचं
किंवा तिला मिळवण्यासाठी
आकाश पाताळ एक करायचं...
एखाद्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात असणं
हा केवळ नियतीचा योगायोग म्हणता येणार नाही
किंवा त्या गोष्टीचं नशीबही नाही
आपलीच इच्छाशक्ती कुठेतरी तिला खेचत असते आयुष्यात येण्यासाठी
म्हणतात ना विलगीकरण निसर्गाचा नियम आहे
ऊर्जेचा प्रवाह हा नेहमी ऊर्जेच्या दिशेने असतो
आणि काळोखात नेहमी काळोखच ओळखला जातो...
                           -कोमल

भगदाड

एक दिवस असतो ना
सगळं वाईट एकाच दिवशी घडतं
अगदी पदरात इतकं वाईट पडतं
की आभाळाला जणु भगदाड पडतं
दुसर्या दिवशी तेच आभाळ 
हात पसरून उभं असतं 
जणुकाही म्हणतं
तुझ्या सुख मिळवण्याच्या प्रयत्नानेच
माझं भगदाड भरणार असतं....
                         -कोमल कोरडे

एक संधी

एक वेळ अशी येते माणसाकडे
जेव्हा तो जिंकलेलं सगळं हरलेला असतो
जे गमावण्याची त्याला सगळ्यात जास्त भीती असते
आता तर गमवायला ती भीतीही नसते...
कागद कोरा होऊन जातो
पुन्हा एकदा मोकळं आभाळ रंगवायला
अन् त्या मोकळ्या आभाळात 
गरूड झेपेचं स्वप्न पहायला....
पण एका चुकीची शिक्षा म्हणून 
एक संधी मिळते का त्याला
पुन्हा एकदा हवं तसं 
स्वत:च्या मालकीचं आभाळ 
विकत घ्यायला.....????

                         -कोमल

आतला आवाज #भाग 5

रस्सीखेच मध्ये पडण्याची शक्यता कोणाची जास्त असते???
शेवटी पडतो तोच जो खेचत असतो
आणि त्याच पडणं न पडणं अवलंबून असतं समोरच्याच्या मनावर...
एकदा मागे खेचणार्या लोकांशी दोन हात करणं सोडलं
की जिंकणं आपल्याच हातात असतं....😇😇😇

                              -कोमल


सौंदर्य आतलं की बाहेरचं???


 सौंदर्य आतलं की बाहेरचं???

खरंच आवश्यक असतं का 
प्रत्येक गोष्टीचं चाकोरीत बसणं
नेहमी नजरेला भावेल
असंच सौंदर्याचं असणं
खरंच आवश्यक असतं का
नेहमीच वठलेल्या झाडावर पालवीचं बहरणं
कोणी पहात का नाही 
पालवी विरहीत दिवस काढलेल्या 
 रूक्ष फांद्यांचं ऐटीत पसरणं....
फुलांनी मनमोहक असावं 
असंही कुठे लिहीलंय
गुलाब काळा असो वा पांढरा
दरवळणं दोघांनाही आलंय...
हरणाने नेहमीच पायांकडे पाहीलं
तर पोटातल्या कस्तुरीचा दरवळ तो कधीच जाणणार नाही
दुषणं देत पायांना
कधीच वार्याला गाठणार नाही...
आपल्यातलं सौंदर्य आपल्यालाच शोधावं लागतं
इतरांनी ते शोधून द्यावं 
अशा अपेक्षेवर राहीलं की 
जे जगापेक्षा वेगळं आहे तेही गमवावं लागतं....
                                    -कोमल

मनाला जाणणारा "मनकवडा"

मनाला जाणणारा "मनकवडा"

शब्द खूप आवडतात मला
पण बोलायला नाही
मनात साचवायला
जसजसे ते साचत जातात
स्वत:शी वाढत जाणारा संवाद
इतरांपासून दूर नेतो मला 
पण माझं माझ्याशीच असलेलं नातं घट्ट करतो
बघणार्याला वाटेलही कदाचित
शब्दांशी माझा छत्तीसचा आकडा
पण न बोलताही नेहमी माझी साथ देतात
त्या शब्दांनाच म्हणेन मी
माझ्या मनाला जाणणारा "मनकवडा".....
                                    -कोमल

आतला आवाज #भाग 4

महत्त्वाकांक्षेचा डोलारा वाढला
की ते कोलमडणारच
पण स्वत: कोसळताना
ते आपल्यासोबत जिद्द चिकाटी संयम यांनाही घेऊन जातो
त्यामुळे शक्य तेवढा मनोरा कमी उंचीचाच असावा
एकदा पाया भक्कम झाला की मनोर्याचे मजले वाढायला मोकळे
पण एक एक करून....
                       -कोमल 


आतला आवाज # भाग 3

माणसाच्या आयुष्यात सुर्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे ना???
एखाद्या दिवशी कितीही वाईट घडलं ,
अगदी होत्याच नव्हतं झालं
तरी एका रात्रीत ताकद असते 
त्या दु:खाची तीव्रता कमी करण्याची
आणि दुसर्या दिवशी उगवणार्या सुर्याच्या किरणात ताकद असते
पुन्हा नव्याने उमेद जागवण्याची
मान गळून पडलेल्या रोपालाही
ताठ मानेने उभे करण्याची....
                       -कोमल

प्रेम मीही केलंय...तुझ्या प्रेमावर

 प्रेम मीही केलंय...तुझ्या प्रेमावर

मी तिच्या डोळ्यांत गुंतलो होतो
ती मात्र शोधत होती  तिचं जग
त्याच डोळ्यांनी
ज्यात माझं जग सामावलेलं होतं....
तिच्या डोळ्यातले भाव मी टिपत होतो
पण निरागस ते डोळे
पापणी न मिटता
वाट पहाण्यात व्यस्त
आतुरतेने अशा वाटेवर
जिथे कधी कोणत्याच पावलाचा ठसा
परतताना दिसला नाही...
तिच्या डोळ्यांत पहायचा होता मला
माझ्यावरच्या प्रेमात
काठोकाठ भरलेला समुद्र
पण मला त्यात दिसला 
समुद्रालाही नेहमी शुष्क रहाण्याचा
नियतीने दिलेला शाप....
                         -कोमल

आजचा दिवस माझा आहे



 आजचा दिवस माझा आहे

आजचा दिवस माझा आहे
स्वत:ला सिद्ध करण्याचा
तुझ्या खांद्याला खांदा लावून 
सोबत पाऊल टाकण्याचा.....

फक्त स्त्री म्हणून केलेली
प्रशंसा मला नको आहे
तुझ्याइतकंच झगडून
मी तुला गाठलं आहे

यशाचं शिखर जसं तू गाठलंय
तसंच गड सर करणारी मी पण आहे
माझ्या यशाचं कारणही
तुझं मला नाकारणं आहे

आधुनिक जगात तुझा दिखावा
मला संधी देण्याचा
पण पाठमोर्या माझ्या अस्तित्त्वावर
मिश्किलपणे हसण्याचा

स्वाभिमान जसा तुझा आहे
तसाच मलाही अभिमान आहे
प्रत्येक वेळेस तू पाण्यात पाहतो मला
पण त्याच पाण्यातला मी सराईत मासा आहे...

शर्यतीत कधीच नव्हते मी
तुझ्या पुढे जाण्याच्या
पण आता उतरावं लागेल शर्यतीत
माझ्या अस्तित्त्वाला जपण्याच्या

कधीच कमीपणा नव्हता मला
तुझ्याकडून शिकताना
तुला नेहमीच भ्रम झाला
तुझ्यामुळेच माझ्या असण्याचा...

एक दिवस तू देतोस मला
मी मुलगी आहे म्हणून काहीतरी करून दाखवण्याचा
पण महिला दिन सोडूनही
प्रत्येक दिवस माझाच आहे...

                          - कोमल कोरडे.

गोष्ट लग्नानंतरची

गोष्ट लग्नानंतरची

सगळंच बदलतं
जेव्हा एक नाव बदलतं
आपल्या नावाचं सर्वस्व
जेव्हा त्याचं नाव घेतं....

काही गोष्टी त्याच्या होतात
तर काही मला दुरावतात
तो आणि त्याचं जग
जेव्हा माझ्या जगाचा भाग होतात...

घर सुटतं कायमचं 
राहतात फक्त आठवणी अन् चिंता
चिंतेच्या त्या चितेत मग
मन होळीसारखं दहन होतं...

जुन्या नात्यांचं अस्तित्त्व संपतं
नवीन नात्यांसाठी 
हसणं विसरून हसणं शिकायचं
त्याच्या घरासाठी....

स्वतंत्र आहे मी
असं कायमंच सांगायचं
पण नकळतपणे स्वातंत्र्य 
त्याच्या स्वाधीन करायचं....

                        कोमल कोरडे

जगण्याचं समाधान

जगण्याचं समाधान... 

काही लोक उगाच म्हणतात
पैशाने सुख विकत घेता येतं...
खरंच का ?
पण हे सुख म्हणजे असतं तरी काय ???
एेषोआरामात रहाणं म्हणजे खरं सुख ,
की जगण्याचं समाधान म्हणजे खरं सुख???
शेवटी सुखाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगळीच...
काहींसाठी सुख म्हणजे स्वत:चं असणं...
तर काहींसाठी आपल्या असण्याचं कारण शोधणं...
काही म्हणतात आयुष्यात सगळं काही मिळवायचंय
तर काही म्हणतात जन्माला येऊन दुसर्यांसाठी जगायचंय...
कधीतरी समोरच्याला हसताना पाहून 
निरागसपणे हसण्यात सुख आहे
तर कधीतरी त्या हसण्याचं कारण बनण्यात...
कारण माणूस पैशाने नाही तर कर्माने मोठा होतो
आणि शेवटी जगण्यासाठी लागतंच काय ???
फक्त जगण्याचं समाधान.....!!!!

                             -कोमल कोरडे

गुण

गुण...

तार्यांना का कोणी नाही विचारत
सूर्य आहे प्रकाश द्यायला
तुम्ही का चमकतात...???
दोन पाय चालायला
पक्षांनो तरी का उडतात....???
नद्यांना नाही विचारत कोणी
पाणी तुमचं पात्र तुमचं
मग शेती का फुलवतात...???
रूप तुमचं गंध तुमचा
मग देवाच्या चरणी फुलं विलीन का होतात...???
ज्याचा त्याचा धर्म आहे
ज्याचे त्याचे गुण
अत्तराला कुपीत ठेवलं
तरी सुगंध जातोच सांगून...

                         -कोमल कोरडे 


अवेळचा पाऊस

 अवेळचा पाऊस

एकदा मी विचारलं पावसाला
तुझं असं अवेळी येण्याचं कारण काय???
त्यावर तो म्हणाला....
तुझ्या मनात दडलेलं
कधीही न उलगडलेलं
लपलेलं शोधायला
मी येतो नेहमीच अवेळी...
बंदिस्त स्वप्नांना
स्वच्छंद जगायला
शिकवतो मी अवेळी...
नकळत तुला हसवतो
अन् तुझ्यासोबत हसतो
मी नेहमीच अवेळी...
तुझ्यातल्या "तुला" शोधून
पुन्हा जगायला लावतो
नव्याने मी अवेळी...

                   -कोमल कोरडे

संघर्ष स्वप्नांचा

संघर्ष स्वप्नांचा

जेव्हा स्वप्नांचा संघर्ष 
वास्तवाशी सुरू होतो
तेव्हा विस्कळीत होतं सगळं काही
स्वप्नांना माघार घेेणं माहीत नसतं
आणि वास्तवाला बदलणं शक्य नसतं...
पण जिंकणार कोणीतरी एकच असतं
स्वप्न जिंकली की माणूस जिंकतो
अन् वास्तव जिंकलं की समाज जिंकतो....
पण वास्तवाशी जुळवून घेऊन 
जेव्हा स्वप्नांसाठी झटतो
तेव्हा माणूस समाजही जिंकतो....

                        -कोमल केरडे

आत्म्याचा शरिराशी संवाद



आत्म्याचा शरिराशी संवाद

#वेळ निघून जाते...ती कधीच वेळ देत नाही विचार करायला...म्हणून आयुष्याची किंमत आपणच करायची असते...कारण एकदा निसटलेलं आयुष्य फक्त सोडून जातं मागे वळून न पहाता...😇😇
--------------------------------------------------------------------------------------------------
तू गेलास 
तू सुटलास 
तुझ्या यातनेतून
तुझ्या न संपणार्या विचारांच्या कलहातून
तुझ्या अपूर्ण , अशक्त, केविलवाण्या स्वप्नांतून
अशक्त आणि केविलवाणीच ती 
मला दुसरा शब्द सुचत नाही 
कारण तुझं असणं त्यांच्या पूर्ण होण्याचं कारण होतं
पण त्या कारणाला तू संपवलंस स्वत:च स्वत:चा गळा घोटून...
तुला वाटलं तुझ्या सोबत आता कोणीच नाही 
कोणाचा मायेचा हात नाही 
कोणाची घट्ट मिठी नाही
ना कोणाचे आधार देणारे शब्द...
पण असं फक्त तुला वाटलं
कारण ते सगळे नेहमीच होते तुझ्या जवळ 
पण तुला तुझी निराशा इतकी स्पष्ट दिसत होती की 
त्यामागे तुला मिठी मारण्याकरता पसरलेले हात तुझ्या नजरेत कधी अंधूक झाले ते तुलाच कळलं नाही..
तू कधीच माझं ऐकलं नाहीस 
तुझ्या जवळ असताना 
पण आज तुला ऐकावं लागेल माझं
कारण मी वेगळा झालोय तुझ्या शरीरातून कायमचा 
आणि बघतोय असं द्दृष्य जे तू जिवंतपणी पाहिलं असतंस 
तर हे जीवन संपवण्याचा विचार कधीच केला नसतास...
मी पहातोय तुझ्याच जवळच्या माणसांना तुझ्यासाठी रडताना
कधी खरचटलं तरी मलम लावणार्या तुझ्या आईवडिलांना तुझ्याच शरीराला अग्नि देताना 
राख होईल तुझ्या शरिराची आज पण राखरांगोळी मात्र त्यांच्या आयुष्याची होईल, 
तू सुटलास कायमचा तुझ्या त्रासातून पण त्रासाचं कारण शोधण्यात आता त्यांचं पूर्ण आयुष्य जाईल.....
माझे शब्द ऐकून तुला दु:ख वाटेल खूप
आणि तू बोलावशील मला पुन्हा तुझ्या शरिरात रहायला
पण मित्रा वेळ निघून गेलीय आता पश्चात्ताप करायला......

                                     -कोमल कोरडे


आयुष्याला इथेच थांबवता येईल का???


आयुष्याला इथेच थांबवता येईल का???

# कदाचित याच असतील आत्महत्या करणार्याच्या मनातील शेवटच्या भावना...

आयुष्याला इथेच थांबवता येईल का???
तिकीट काढलेलं ठिकाण न गाठता 
जिथे मन रमलंय तिथेच
मुक्काम ठोकता येईल का??
गती असलेलं वाहन 
आपोआप स्तब्ध होईल का???
नाही जायचंय ठरलेल्या ठिकाणी
म्हणून वळण घेईल का???
रूळावरची गाडी कधी
आपला मार्ग सोडेल का???
का चालावं मी आखलेल्या रेषेत
म्हणून खाली उतरेल का???
नको असलेला प्राण शरीरातला
कुणाला त्यागता येईल का???
इच्छा मरणाचं वरदान 
कधी कुणाला मिळेल का..????
                          -कोमल 

प्रेम हे


प्रेमासाठी आसुसलेलं मन

प्रेमासाठी आसुसलेलं मन एका निरव वाटेवर डोळे लावून बसलं त्याच वाटेवर मात्र त्याला धुक्याने घेरलं  त्या दाट धुक्याच्या मागे प्रेम असेल  म्हणून...